शिल्लक मंत्रीपद आरपीआयला मिळावे;रामदास आठवले यांची मागणी

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.15) पार पडला. या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.त्यामुळे ते नेते नाराज पाहायला मिळत आहे. आरपीआय पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

                       

 

रामदास आठवले म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असून तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की,आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. परंतु तसे काही झाले नाही त्यामुळे आमचा पक्ष नाराज आहे. एक मंत्रीपद शिल्लक आहे ते आरपीआयला मिळावे. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

🤙 9921334545