मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे . महायुतीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर देतो आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवते. राजस्थान आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपने नवीन प्रयोग राबवले. मात्र, महाराष्ट्रात अ प्रयोग होणार का, याबाबत मी काही सांगू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “निवडणूक निकालांवर सखोल चर्चा होत असून पक्षाच्या केंद्रीय समितीत विविध विषयांवर निर्णय घेतले जातात. आमचे नेते कोणाला मंत्रीपद द्यायचे, यावर योग्य वेळी निर्णय घेोतील.”