सरनोबतवाडीतील नागरिकांनी ऋतुराज पाटील यांचे मानले आभार

कोल्हापूर :सरनोबतवाडी (करवीर) येथील स्मशानभूमीमध्ये निवारा शेड उभे करण्यात आले आहे.या शेडसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँक्रिटीकरण व बसण्यासाठी बाकडी दिली. या ठिकाणी ऋतुराज पाटील यांनी भेट दिली असता नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

यावेळी के.डी. माने, अनिल गजबर, सरपंच शुभांगी आडसूळ, सतिश लाड, किरण आडसूळ, अरूण भोसले, योगीराज आडसूळ, संग्राम गजबर, बंडू खोत, संतोष शिंदे, सागर गजबर, अक्षय कोरे, योगिता आडसुळ, वैशाली माळी, महेश दुर्गुळे, आशिष कांबळे,वसंत खांडेकर, अशोक कांबळे, दादासो कांचनवाडकर, बाबासाहेब एरंडोळे, युवराज कळके, ग्रामसेविका दिपा यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.