कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण मी करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहीन : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: ना दक्षिण ना उत्तर, विकास दक्षिणोत्तर याचप्रमाणे आजवर फक्त मतदारसंघातलीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण मी करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहीन. असे प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांसह सर्वजण मोठया संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यास जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.