परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

कोल्हापूर: स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आपण राजे फाउंडेशनच्या माध्यमातून परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता यांच्यासमवेत संपन्न झाला.

यावेळी ७० हून अधिक विजेत्यांना सन्मानित करताना येत्या पिढ्यांना उत्तम वक्ते बनवण्यासाठी आमचा हा प्रयत्न असून कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर या परिसरातून आदर्श पिढी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी राजमाता जिजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता यांनी स्व. राजे यांच्या आठवणींना उजाळा देत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली.