“काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा करू नये” : संजय राऊत

मुंबई : काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिंकणारा उमेदवार असेल त्याला संधी दिली जाईल. असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान राज्यात तयार होत असलेल्या तिसरी आघाडी संदर्भात देखील राऊत यांना विचारण्यात आलं यावेळी राऊत म्हणाले की, “तिसरी आघाडीही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते, कारण ती विरोधकांची मत फोडते.”