नेपाळमध्ये बसचा अपघात 14 जण मृत्युमुखी,मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

मुंबई:भाविकांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात नेपाळमध्ये झाला असून आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या बसमधून प्रवास करणारे भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचे माहिती समोर आली आहे. सुमारे 40 भाविकांना घेऊन पोखरा येथून काठमांडूला जात असताना या बसला अपघात झाला आणि ही बस नदीत कोसळली.

या बस मध्ये महाराष्ट्रातील एकूण 110 भाविक हे नेपाळला तीर्थयात्रेला गेले होते.  प्रयागराज येथून तीन बस मधून ही प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. तीन बस पैकी एक बस घसरून नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने अपघाताची तीव्रता वाढली. अपघात ग्रस्त बसमधील प्रवासी वाहून गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.