कोल्हापूर: बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाला या घटनेवरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या ,पालकांनी आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊन नये . कायद्याच्या चौकटीतच राहून गुन्हेगारांना शिक्षा देता येईल हे पाहणे महत्त्वाचे असते . संशयित गुन्हेगारांना फाशी लवकरात लवकर कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल .बदलापूर येथे पोहोचून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार असून, त्याचा अहवाल लवकरात लवकर राज्य सरकारला सुपूर्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपले ते बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ अशा पद्धतीचे राजकारण महिलांच्या प्रश्नात आणू नये असेही त्या म्हणाल्या.