मराठा समाजासाठी आज विशेष अधिवेशन; अहवाल होणार सादर

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनामध्येच राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार आहे.

या अहवालातून स्पष्ट होईल की, राज्यामध्ये किती टक्के मराठे सामाजिक व आर्थिकद़ृष्ट्या मागास आहेत. यातूनच पुढे ठरवले जाईल की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे की नाही. या कारणामुळे आजचे हे अधिवेशन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, तसेच, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची अधिसूचना अधिवेशनात जारी करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या यातील किती मागण्या सरकार मान्य करतील हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.