अधिवेशनानंतर आंदोलनाची पुढील दिशा: जरांगे पाटील

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ता.20,21,रोजी होत आहे. या मध्ये महत्वाच्या विषयावर निर्णय होणार आहे. या मध्ये काय निर्णय होतो शासनाची काय भूमिका आहे. हे कळेल त्या नंतर मुंबईला जाण्याची व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे मनोज जरांगे यांनी शनिवार (ता.17) रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले.

या ठिकाणी मनोज जरांगे शनिवार (ता.10) पासून उपोषण करत आहे शनिवार ता.17 रोजी त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. राज्यात 10 वी ,12 वी च्या परीक्षा सुरू आहे या परीक्षेला विद्यार्थांना जाता यावे या साठी समाज बांधवांनी पुढे होऊन मदत करा , त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका, वाहणे अडवु नका , शांततेत आंदोलन करा , वाटल्यास अधिवेशन होईपर्यंत आंदोलन थांबवा असे जरांगे यांनी सांगितले आहे.