बोर्डांच्या परीक्षांसाठी अनेक नियम लागू

मुंबई: दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहे. त्यात 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. आता यावर्षी या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक नियम लागू करण्यात आलेले आहेत.

त्यातील पहिला नियम म्हणजे आता विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. पेपर सुरू झाल्यानंतर जर एखादा विद्यार्थी आला. तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही. अशी सूचना प्रत्येक केंद्रांना देण्यात आलेले आहेत.यावर्षी बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे एकाच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेच्यासाठी एकामागे एक बसणार नाही. त्यांचे परीक्षा क्रमांक हे वेगवेगळ्या केंद्रावर असतील. विद्यार्थ्यांनाही परीक्षा चालू होण्याआधी दहा मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिका दिली जायची. परंतु आता ही पद्धत बंद करणार आहे. आणि पेपरसाठी दहा मिनिटे वाढून वेळ दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या जवळपास 100 मीटर अंतरावर सर्व झेरॉक्स दुकाने, संगणक क्लास पेपर होईपर्यंत बंद राहण्याच्या आदेश दिलेले आहेत. त्याशिवाय भाषा आणि इतर विषयांच्या पेपर साठी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मिळेल इतका वेळ दिलेला आहे.