पाणीपुरवठा सुरळीत करावा अथवा घरटी १० किलो दिवाळी फराळ महापालिकेने द्यावा : किशोर घाटगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): जर काळम्मावाडी थे पाईपलाईन च्या ठेकेदाराचा आठकोटी दंड माफ करुन श्रीमंत महापालिका जर हजारात करत असेल तर आज पाणी पुरवठा रोज येत नसलेने महिला वर्गाचा सगळा वेळ पाणी गोळा करण्यात जात असून दिवाळी या मोठ्या सणाचा फराळ करण्यास वेळ नाही. त्यामुळे प्रशासनाला जर दिवाळीपूर्वी हे नियोजन मागे घेता येत नसेल तर ठेकेदाराचा दंड मागे न घेता त्याच पैशातून घरटी १० किलो तयार दिवाळी फराळ द्यावा अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने समन्वयक किशोर घाटगे यांनी केली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेने ऐन दसरा – दिवाळीत बालिंगा पंपींग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या शहरातील दाटीवाटीच्या भागातील पाणीपुरवठा एक दिवस आड केला आहे. यावर कोल्हापूरात तीव्र प्रतिक्रिया उमटून हे नियोजन रद्द करावे अशी सर्व करवीरकरांची मागणी आहे.

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजन फोल ठरले असून विशेषत: महिला वर्गाला याचा त्रास होत आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे भरली असून काळम्मावाडीचे पाणी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला मिळणार हे पालकमंत्र्यासह नेते
सांगत आहेत. या योजनेतील आज तांत्रिक अडचणी महापालिकेस दूर करता येत नाहीत. बंगलोर वरुन तंत्रज्ञ बोलवतात हे कसले रोज थेट पाईपलाईनचे पाणी देणार ? अशी भावना जनतेची आहे. आजच प्रशासनाने सरळ ३ दिवस सलग पाणीपुरवठा बंद करणार असे जाहीर केले आहे.

तरी महापालिकेने हे भोंगळ नियोजन त्वरीत मागे घ्यावे जर काळम्मावाडी थे पाईपलाईन च्या ठेकेदाराचा आठकोटी दंड माफ करुन श्रीमंत महापालिका जर हजारात करत असेल तर आज पाणी पुरवठा रोज येत नसलेने महिला वर्गाचा सगळा वेळ पाणी गोळा करण्यात जात असून दिवाळी या मोठ्या सणाचा फराळ करण्यास वेळ नाही त्यामुळे प्रशासन जर दिवाळीपूर्वी हे नियोजन मागे घेता येत नसेल तर ठेकेदाराचा दंड मागे न घेता त्याच पैशातून घरटी १० किलो तयार दिवाळी फराळ द्यावा ,अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने समन्वयक किशोर घाटगे यांनी केली आहे.