चेंबूर येथे सोळा विद्यार्थ्यांना विषबाधा

चेंबूर : चेंबूर आणिक गाव येथे पालिकेच्या शाळेत सहावी आणि सातवीच्या 16 विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

आज दुपारी 12 च्या सुमारास माध्यान्य भोजन घेतल्यानंतर मुलांना अचानक मळमळ, उलटी आणि पोटदुखी झाली. या विद्यार्थ्यांना तातडीने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व मुलांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.