मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय : आ.नितेश राणे

मुंबई : “इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, राहुल गांधीं हे नेते मुंबईत येत आहेत, त्यांच्या राज्यात लव जिहादच्या केसेस होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव ठाकरे विचारणार का ?” असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.संजय राऊत यांनी नीती आयोगाबाबत टीका केली. मुंबई महाराष्ट्र राज्यापासून तोडणार असा जुना टेपरेकॉर्डर सुरू आहे. मोदी व शाह नसते, तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती. मुंबईला पाटणकर व सरदेसाई यांच्याकडून धोका आहे” असं नितेश राणे म्हणाले. “या बैठकींचा काही परिणाम होणार नाही. मुंबईला कोण गिळत होतं, तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी” अशी टीका नितेश राणे यांनी केली.इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते मुंबईत येत आहेत.मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय असं नितेश राणे म्हणाले.

“संजय राऊत याने अनेक भाकीतं केली. त्यातील एकही भाकीत खर झालं नाही. अटक होण्याच्या भीतीने हे बोलत आहेत. संजय राऊत जेलमध्ये बसणार” असं नितेश राणे म्हणाले. • सुनील राऊत याला पक्षात घ्यायला कोणी 100 कोटी नाही, तर 100 रुपये पण देणार नाही“सुनील राऊत याला पक्षात घ्यायला कोणी 100 कोटी नाही, तर 100 रुपये पण देणार नाही” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “राजाराम राऊतची दोन्ही मुलं खोटारडी आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हा सुनील राऊत अमित शाहंच्या कार्यालयाबाहेर व भाजप कार्यालयाबाहेर चार चार तास थांबून होता. आम्ही भाजपात प्रवेश करतो पण माझ्या भावाला सोडा अस सांगत होता” असा दावा नितेश राणे यांनी केला.