शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मागणी

नाशिक: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

अकोले तालुक्यातील आढळा विभागातील समशेरपूर, टाहाकारी, सावरगाव पाटसह परिसरात आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काही परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटसह अतिवृष्टी झाली. गारपीट आणि अतिवृष्टीमुळं या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनानं तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

🤙 8080365706