
मुंबई : शेतकऱ्यांना १२ तास वीज देऊ. त्यासाठी शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

दिवसा 12 तास वीज द्या, अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी आहे. त्यासाठी आपण एक निर्णय घेतलाय. यासाठी सोलरवर आम्ही भर देत आहोत. याचा पहिला प्रयोग आपण 2017 मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावात केला होता असेही फडणवीस म्हणाले. तो सत्यात उतरला आहे. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला.
या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही सोलरवर भर देत आहोत. यावर्षी 30 टक्के फिडर आम्ही सौरऊर्जेवर आणणार आहोत. त्याठिकाणी दिवसा 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असे फडणवीस म्हणाले. 2017 साली आपण पहिला प्रयोग राळेगणसिद्धीत केला होता. तो खूप यशस्वी झाला होता. यावर्षीपासून सोलरच्या संदर्भातील काम सुरु करणार आहोत.
