कोल्हापूर परिसरात पावसाची दमदार हजेरी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (गुरुवारी) दडी मारलेल्या पावसाने आज (शुक्रवारी) पुन्हा जोर धरला आहे. मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली होती. पण काल (गुरुवारी) परतीच्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती.

पण आज पुन्हा सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. त्यामुळे उकाडा थोडाफार जाणवत होता. सायंकाळी चार नंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली.

कोल्हापुर शहर परिसरासोबत पश्चिम भागातही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर नुकतीच सुरु झालेली गुऱ्हाळे बंद पडली असून नुकसान झाले आहे.परतीच्या पावसाला नागरिक वैतागले असून आता बस्स झालं.. जा बाबा असा सूर नागरीकांमधून उमटत आहेत.