राजाराम बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर प्रतिनिधी : काल शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगेचे पाणी वाहत आहे. या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या वाहतूक सुरु आहे.