सध्या राज्यात फक्त ‘एक दुजे के लिए’ : ‘यांचा’ हल्लाबोल

मुंबई : राज्यात सध्याच्या राजकारणात नवीन सिनेमा सुरु आहे, तो म्हणजे ‘एक दुजे के लिए’. आता पडद्यावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. संसदेत प्रखर बोलण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. केंद्राकडून लोकशाहीचे पंख छाटण्याचे काम सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. खासदार राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांची स्थिती काय होते हे माहीत आहे. आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास आहे. तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा. तुम्ही शिवसेना, शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे. शिवसेनेचा गैरवापर करु नका. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार झाले आहेत. तसेच संसदेत आता प्रखर बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. खरे बोलण्यावर बंदी आणणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे होय. संसदेत लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल? हे सरकार लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले आहे. त्यांच्याकडून जर अशी मुस्कटदाबी होणार असेल तर या देशात लोकशाही आहे का? हा प्रश्न निर्माण होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.

🤙 8080365706