मुंबई:हिंदी भाषा सक्ती हे म्हणजे उद्याच्या महापालकेच्या निवडणुकीसाठी पडद्यामागचं नाटक आहे. कोणता तरी एक पक्ष हिंदीची मागणी करतो, त्यानंतर त्या पक्षाच्यावतीने शिवाजी पार्कवर जाऊन त्या नेत्याशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी मोठे हिंदीविषयी ट्विट होतं. सांगर बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं, इतकी तत्परता असू शकते का? मराठीविषयी प्रेम आहे आणि दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेश करणार नाही. हिंदी भाषा विद्यार्थ्यांवर लादू नका, महाराष्ट्राला मुंबईला हिंदी आणि मुंबई शिकवण्याची गरज नाही. हिंदी गुजरातला शिकवा, असं म्हणत संजय राऊत संजय राऊत यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावला.

आमरस पुरी खायला एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ कॅफेमध्ये आले होते, आता नवीन आमरस-पुरी खाल्ली. जनतेला कोण आहात सांगून टाका, नक्की कोण आहात? कितीवेळा कपडे बदलणार आहात, एकदा बदला नाहीतर सगळे काढून टाका. फडणवीस आणि शिंदे रोज येऊन कपडे काढून जात आहेत. तुमचे स्वत:चे मत आहे की नाही, भाजपचा नेता येतो तुमची भुमिका बदलते, शिंदेंचा माणूस येतो तुमची भूमिका बदलते, लोकांचं मनोरंजन होतंय हे कोणत्याही पक्षासाठी चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कॅफेमध्ये बोलवा आणि सांगा. एकनाथ शिंदे कॅफेमध्ये आले, दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट, उठले कधी आणि लिहिलं कधी? आम्ही पण माणसं आहोत, लिहिणारे लोक असल्याचं संजयराऊत म्हणाले.
कुठून तरी आलेले स्क्रिप्ट वाचू नका, तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू, कधी सिंधू आणि कधी बिंदू असता. काय ते ठरवा, सुधाकरासारखे एकच पॅरामधील बोलू नका, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला.चा प्रसार करावा. पण अभ्यासक्रमामध्ये लादून विद्यार्थांचं नुकसान करू नका. महाराष्ट्रमध्ये सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी, नोकरी धंद्यामध्ये मराठी सक्तीची करावी, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
