‘इचलकरंजी पाणीप्रश्नाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणार’- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील पंप व संप हाऊसचा लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून राजाराम स्टेडियम विकसित करणे आणि मनपा निधी मधील अन्य लोक उपयोगी कामांचा शुभारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेशरावजी हाळवणकर होते.यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, कार्याध्यक्ष अमित गाताडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले, माजी नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी, उप आयुक्त सोमनाथ आढाव, उपआयुक्त स्मृती पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा सुभाष देशपांडे, महेंद्र क्षीरसागर, यांच्यासह मान्यवर व नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.