‘स्वातंत्र्यदिनी’ या राज्यावर होऊ शकतो आत्मघाती हल्ला !

दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान जम्मू मध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील दहशतवादी दिल्ली किंवा पंजाब मध्ये आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळालेली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा हाय अलर्ट वर आहे .

सुरक्षा दलाच्या मोठ्या प्रमाणातील तैनातीमुळे 15 ऑगस्टला हल्ल्याची योजना आखली गेली नसावी, परंतु एक किंवा दोन दिवसांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असे गुप्तचर यंत्रणेने सुचित केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ च्या सीमेला लागून असलेल्या एका गावात दोन अज्ञात व्यक्ती शस्त्रासह हालचाली करताना दिसून आले आहेत . ‘लष्कर ए तैयबा’ आणि ‘जैश ए मोहम्मदचा’ दिल्लीला लक्ष्य करण्याचा कट असल्याचे देखील नमुद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर दिल्लीत 15ऑगस्ट पर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबाबत सतर्क करण्यात आले आहे.