देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे;* *युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल : श्री.राजेश क्षीरसागर*

कोल्हापूर दि. ०४ : प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात तरून वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.

त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणे गरजेचे असून, देशसेवेसाठी आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या हेतूने युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मित्रा संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीच्या सक्षमीकरणाकडे भर देण्यात येत असून, युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल, अशा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने मैत्री दिनानिमित्त “राजेश युथ फेस्टिव्हल” चे मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो. याचे औचित्य साधून युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री.ऋतुराज क्षीरसागर आणि युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गेली १२ वर्षे फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते. या फेस्टिव्हलमध्ये महाविद्यालयीन युवा वर्गास शिक्षणासोबतच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

रविवार सांयकाळी राजेश युथ फेस्टिव्हलचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित हजारो युवक – युवतींना निर्व्यसनी होण्याकरिता शपथ श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. युवा वर्गानेही यास दाद देत निर्व्यसनी होण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, युवा वर्ग हा आपल्या देशातील लोकसंख्येचा एक महत्वाचा घटक आहे. युवकांची मोठी संख्या हि आपल्या देशाची शक्ती आहे. किंबहुना ते आपल्या देशाचे मोठे श्रम भांडवल आहे. याचा विचार करता युवा वर्गाने स्वत: देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये सामील होणे गरजेचे आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून युवा वर्गास शिक्षणासह रोजगाराच्या संधी देत आहे. या संधीचा फायदा युवा पिढीने घ्यावाच पण स्वकर्तृत्वातून देश हितासाठी आणि देश सेवेसाठी योगदान द्यावे. युवा पिढीचा सर्वांगिण विकास राष्ट्र उभारणी साठी महत्वाचा आहे. त्यामुळे निर्व्यसनी राहून आई- वडिलांची, देशाची सेवा करावी. यासह स्वकर्तृत्वातून देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी राजेश युथ फेस्टीव्हल अंतर्गत पार पडलेल्या फुटबॉल टर्फ स्पर्धा, आर्ट स्पर्धा, फॅशन शो आदी स्पर्धांचे बक्षीस वितरण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री.ऋतुराज क्षीरसागर आणि युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

राजेश युथ फेस्टिवलं अंतर्गत पार पडलेल्या विविध स्पर्धेअंतर्गत कलाकृती स्पर्धेत प्रथम क्रमांक कशीक आडसूळ, द्वितीय क्रमांक कशीक पटेल, तृतीय क्रमांक सोनाली पोवार, उत्तेजनार्थ क्रमांक रोहित गायकवाड, रोहित सुतार यांनी मिळविले. सौदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सेजल पाटील, द्वितीय क्रमांक नाज मुल्ला, तृतीय क्रमांक निकिता मुरगूनडे, बेस्ट वॉक प्रणोती कुंभार, बेस्ट स्माईल मानसी सुतार, बेस्ट पर्सनॅलिटी गौसिया हबीब, ओव्हर ऑल कॉन्फिडन्स योगिता हावलदार यांनी मिळविले.
या सांकृतिक कार्यक्रमामध्ये रॉक बँड ग्रुपच्या कलाकारांनी केलेल्या विविध हिंदी मराठी गाण्यांच्या डान्सवर युवा वर्गाने जल्लोष केला. तर डीजे विकी, अँकर ऐश्वर्या यांच्या एकापेक्षा एक सर्सास सॉंग ट्रॅकनी उपस्थित युवा वर्गास थिरकायला लावले.
यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, युवसेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री.ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, युवा सेनेचे चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, मंदार पाटील नो मर्सि ग्रुपचे अजिंक्य पाटील, अक्षय पाटील, दिग्विजय साळोखे, धनराज कणसे, रोहित मेळवंकी, करण मिरजकर, ओंकार वाले, राज अहमद सय्यद, धवल भोसले, ओंकार यादव, समरजित मोहिते, विपुल भंडारे, अभिषेक बागल, आदी उपस्थित होते.

🤙 9921334545