पुण्याच्या ओतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी ‘त्या’ चुकीवर भाष्य केलं. मी केली. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय ही माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक आता तुम्ही सुधारा… असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे . गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करताना दिसतात. आजही जाहीर सभेतून अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजेश टोपे सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन शरद पवारांकडे गेले होते. आम्ही ही सगळे त्रासून होतो , त्यामुळं पवार साहेब म्हणाले मी राजीनामा देतो. भावनिक राजकारण नकोय असं अजित पवार म्हणाले. एक जण तर म्हणाला अजित पवारांना शरद पवार साहेबांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते. अरे बाबा सांभाळले असते. त्यात काय, मी पण शेतकऱ्यांचा पोरगा आहे, असं अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. ते येण्यापूर्वी माझं भाषण झालं होतं. त्यानंतर मोदीसाहेब आले. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले. मग मी माझ्या खुर्चीवरून उठलो अन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो. तात्पुरता बसलो बरं का…. मोदी साहेबांना कांदा निर्यातीचा प्रश्न सांगितला. निर्यातबंदी हटविण्याची विनंती केली. पुढं काय घडलं ते पाहिलं तुम्ही, असं अजित पवार ओतूरच्या सभेत म्हणाले.