
रायगड : जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (इर्शाळगड ) इथं दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
