
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असून कोल्हापुरातही याचे दि.४ रोजी दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली आहे.

पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ही सावरकर गौरव यात्रा विविध सामाजिक संदेश देत यशस्वी करण्याचा निर्धार केला.संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपा प्र. का सदस्य महेश जाधव यांनी सावरकरांचा इतिहास आणि विविध घटनांचे विस्तृत विवेचन कार्यकर्त्यांना केले.राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या गौरव यात्रेतून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार असल्याचे राहुल चिकोडे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले,राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबर युती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाज्वल्य इतिहास युवा पिढी समोर येण्यासाठी दिनांक 4 रोजी सायंकाळी 4 वाजता सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सावरकर प्रेमी जनतेने मिरजकर तिकटी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.यावेळी राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, हेंमत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, विजय खाडे, अजित ठाणेकर, विजय आगरवाल, गायत्री राऊत, गिरीष साळोखे, डॉ राजवर्धन, रमेश दिवेकर, रवींद्र मुतगी, विवेक वोरा, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, अमेय भालकर, सचिन सुतार, समीर यवलुजे, तौफिक बागवान, किरण कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
