
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मा.आ.अमल महाडिक यांचा प्रयाग चिखली गावाचा दौरा पार पडला. यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले “आजतागायत कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारी मंडळीच आज विस्तारीकरणाबाबत आम्हाला विचारणा करत आहेत. या गोष्टी सभासद शेतकरी जाणून आहे.वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये यांनी विस्तारीकरणाला केलेला विरोध सर्व सभासदांनी पाहिलेला आहे. तरी मी विरोधकांना सांगू इच्छितो, इथून पुढे कोणी कितीही विरोध केला तरी कारखान्याचे विस्तारीकरण हे होणारच.
!” “गगनबावड्यातील डि.वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. पण ही लबाडी राजाराम चा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे. त्यामुळेच त्यांची पोळी इथे भाजली जाणार नाही, याची खात्री आता विरोधकांनाही पटलेली आहे.” असे मत महाडिक यांनी व्यक्त केले.
यावेळी बटूसिंग रजपूत, रघुनाथ पाटील, पांडबा यादव, संभाजीराव पाटील, हंबीरराव वळके, बी.आर.शिंदे, केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले, बाळासाहेब वरूटे, बाजीराव नाईक, इंद्रजित पाटील, बाजीराव पाटील (नाना), सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, भीमराव खांटांगळे, शिवाजी चौगुले, विठ्ठल पाटील, बाबासो पाटील, अभिजीत पाटील, जयसिंग पाटील, किरण जाधव, शिवाजी गाडवे, जयसिंग काशीद यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
