समरजितसिंह घाटगे यांच्या सांगण्यावरूनच आ. मुश्रीफ यांच्या घरावर धाड: भैय्या माने यांचा गंभीर आरोप..

कोल्हापूर : चार दिवसापूर्वी आ. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने धड टाकली होती.यावेळी आमच्यातील काही लोकांनी रागापोटी ही धाड राजे समर्जीतसिह यांच्या सांगण्यावरून दिल्लीतील मंत्र्यांकडून केल्याचा संशय व्यक्त केला होता. नंतर आम्ही ते विसरून गेलो, पण वस्तुस्थिती पाहता ही धाड राजे समराजीत सिंह घाटगे यांच्या सांगण्यावरून च झाल्याची खात्री केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भैय्या माने यांनी केला.

समरजीत घाटगे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सांगण्यावरून ही धाड झाली नाही असे सांगितले.त्यांनी पत्रकार परिषद घेणे हाच आमच्या दृष्टीने पुरावा आहे. त्यांचा बोलण्याचा रोख पाहता आणि धाड पडली त्याच दिवशी ईडी वर वर्चस्व असलेल्या मंत्र्यांची त्यांनी दिल्लीत भेट घेतल्याने त्यांनीच ही धाड घडवल्याचा दाट संशय आहे. मुश्रीफ हे जनतेत लोकप्रिय आहेत. म्हणूनच धाड पडली त्यावेळी लोक रंस्त्यावर आले. समर्जीतसिह घाटगे हे राजर्षी शाहूच्या तुकड्याचे वारसदार असतील पण शाहूंच्या खऱ्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत’ असा गंभीर आरोप भैय्या माने यांनी केला.या पत्रकार परिषदेला युवराज पाटील, मनोज फराकटे, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.