महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासाठी आज महत्त्वाचा दिवस….

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा दिवस असून हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचं उत्तर मिळणार आहे.

आधी 2 न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर 7 न्यायमूर्तींचं बेंच…असा या सगळ्या केसचा प्रवास आत्तापर्यंत राहिला आहे.