कोल्हापर शहराच्या हद्दवाढीसाठी शरद पवारांना निवेदन…

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ झालेली नसून पुणे शहराप्रमाणे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, काही वर्षापूर्वी केंद्र शासनाकडून २७ बस केएमटीला दिल्‍या होत्या. त्याच धर्तीवर पुन्हा बस दिल्यास केएमटीचा, महापालिकेचा तोटा कमी होणार आहे. पंचगंगेची गटारगंगा झाली आहे. त्याला महापालिका तसेच इतर घटक जबाबदार असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करीत नाही. अधिकाऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई करावी. केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा. संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी निवेदन दिले.