कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना ; पाच दिवस बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आढळला घरच्या माळ्यावर..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी धक्कादायक अशी घटना घडली आहे. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध लागत नसल्याने आई निराश झाली होती. तिच्या परीने सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, मुलाचा शोध काही लागत नव्हता. मात्र, पाच दिवसांनी घरात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर तिने माळ्यावर जाऊन पाहिले असता मुलाने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्यानंतर आईने एकच हंबरडा फोडला. आपल्याच लेकराने घरच्या माळ्यावर आत्महत्या केल्याची तिला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. मुमेवाडी आजरा येथील भिऊगंडेत स्वप्नील शिवाजी भिवंडी (वय 28) हा आईसोबत भाड्याच्या घरात राहत होता. वडील वारल्यानंतर आईनेच स्वप्निलचा सांभाळ केला होता. तो एका ठिकाणी नोकरी करत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्यानंतर कासावीस झालेल्या आईने त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिवसभर काम करून आई शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मुलाचा काहीच शोध लागत नव्हता. त्यांच्या राहत्या घराच्या माळ्यावरून दुर्गंधी यायला लागली म्हणून त्यांनी माळ्यावर जाऊन पाहिले आता स्वप्नील छताला गळफास घेतल्याचे आढळले. दरम्यान, याबाबत पोलिसांना नोंद झाली आहे.

🤙 8080365706