
कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी लेखक डॉ योगेश राणू साळे यांनी रचलेल्या चैतन्यमृत (भाग -२), अनंतानुभूती (भाग -१) आणि घटनामृत घडीपत्रिका या काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा सेवानिवृत्त तालुका आरोग्य अधिकारी शिवाजीराव भोई यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. साळे यांच्या राजेंद्र नगरातील समर्थ नगर येथील ‘योगभारती’ या राहत्या घरी पार पडला.यावेळी दत्त जयंतीनिमित्त गुरू पादुका अभिषेक व पूजन आणि भक्ती गीत गायनाचा ही कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या सोहळ्यास ई. टिव्ही मराठी वाहिनीचे दर्शनकार शिवाजीराव भुकेले, कवयित्री व लेखिका शर्मिष्ठ ताशी, कवी व लेखक भगवान पाटील (जि. प. सदस्य), युवराज कदम – प्रकाशक वाचनकट्टा यांच्यासह अनेक मान्यवर व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.