आलिया भोगासी असावे सादर, लढावं तर लागेलच : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढच्या भूमिकेसंदर्भात बोलताना, आव्हाड म्हणाले, राजकारणाचे डायनामिक्स दर मिनिटाला बदलतात. त्यामुळे परिस्थिती नुसार निर्णय घेऊ. एवढेच नाही तर, मराठीत एक म्हण आहे, आलिया भोगासी असावे सादर, म्हणजे शेवटी आला अंगावर तर शिंगावर घ्यावाच लागेल ना. लढावं तर लागेलच.

न लढता निपचित पडणं, हे आपल्या धर्मात नाही. लढून मरीन, पण कुणाच्या पायाशी शांत बसून जिवंत राहण्यापेक्षा, समोरच्याला आव्हान देत मी माझं मरण पत्करीन, असेही जितेंद्र आव्हा यांनी म्हटले आहे.या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता, “मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री आहेत. पण ते २७-२८ वर्ष माझे जुने मित्र आहे. मला संशयही नव्हता, की या संपूर्ण कारस्थानात कोण असेल, काय असेल? पण तो व्हिडिओ स्पष्ट करतो ना, की या मागे कोण असून शकतं?” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

🤙 8080365706