
बुलढाणा : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या काल पत्रकारावर भडकल्या. यावर विचारलं असता माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, चित्राताई या विचित्र ताई आहेत, हे सर्वांनाचं माहीत आहे.
अरेरावी किती प्रमाणात करावी. ही लोकशीही की, हिटलरशाही आहे. वारंट निघालं, धमकी दिली तरी त्यांच्यावर सुरक्षा दिली जात आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला विरोध करावासा वाटतो. कारण इतिहास मोडतोड करण्यात येत आहे. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला. त्यांना अटक करण्यात आली. ही संविधानाला मान खाली करावं लागणारी आहे. असं कसं लोकशाहीमध्ये होत आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
