वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात

          आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि  उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटने मुळे शहरात व उपनगरात भीतीचे वातावारन झाले आहे. रात्री अपरात्री महिला वर्गात रस्त्यावरून जाताना मनात भीती घेऊनच चालावे लागते.

अशा पार्श्वभूमीवर आम. ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांची  शिष्टमंडळासह भेट घेऊन वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून चोरांचा लवकरात लवकर शोध लावावा  आशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. शहर आणि उपनगरात गस्त वाढवून मोरेवाडी, पाचगाव जुना वाशी नाका, कळंबा या परिसरातील नादुरुस्त  सीसीटीव्ही कॅमेरे  लवकरच दुरुस्त केले जातील ,अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांनी  यावेळी दिली.या भेटीवेळी आ. पाटील यांनी  उपनगरांमधील कॅमेरे बंद असल्यामुळे चोरट्यांचा वावर वाढत असल्याचे  निदर्शनास आणून दिले पाचगाव ,मोरेवाडी, जुना वाशी नाका, कळंबा  या परिसरात जवळपास 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातील बरेच कॅमेरे बंद असल्याचे त्यानी सांगितले.पाचगाव, मोरेवाडी कळंबा या परिसरातील सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम हे कळंबा या ठिकाणी करण्यात आले आहे. या ठिकाणचं लाईट बिल अधिक असून पोलिस प्रशासनाने ते अदा करावे, अशी विनंती पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी केली.

जिल्हा पोलिस प्रमुख बलकवडे यांनी सांगितले की, ज्या परिसरात चोऱ्या झाल्या आहेत त्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कळंबा सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधील वीज बिल मिटर हे पोलिस प्रशासनाच्या नावावर घेवून  वीज  बिल अदा केले जाईल. तसेच  30 लाख रुपये खर्च करून  गांधीनगर परिसरात सुद्धा सीसीटीव्हीचे  182 कॅमेरे बसवले जाणार  आहेत.  या शिष्टमंडळात पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडी सरपंच रूपाली बाजारी, पाचगाव उपसरपंच स्नेहल शिंदे, सुदर्शन पाटील प्रशांत देसाई, अभिजीत भोसले, संग्राम पोवाळकर,  सुनील शिंदे,  नारायण गाडगीळ यांचा समावेश होता.